google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचे थैमान, मृतांचा आकडा 21

हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे या भागातील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी रस्त्याचे नदीमध्ये रुपांतर झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनादेखीस घडल्या आहेत. मुसळधार पवासामुळे येथे पुरस्थिती निर्माण झाली आसून या संकटामुळे आतापर्यंत २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण बेपत्ता असून बचाव पथकाच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जात आहे. मागील २४ तासांपासून येथे मुसळधार पाऊस सुरू आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस असून येथे ३४ ठिकाणी भूस्खलन तसेच पुरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब-हिमाचाल प्रदेश सीमेजवळ कांग्रा जिल्ह्यात असलेला एक रेल्वे रुळदेखील कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे येथे नदीला पूर आला होता. याच कारणामुळे हा पूल कोसळला आहे. चंबा येथील बनेट गावातही भूस्खलन झाल्यामुळे येथे तीन जणांचा मृत्यू झाला. यातील दोघांचा मृतदेह हाती लागला असून दिसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तराखंडमध्ये सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढला आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!