google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

‘मातोश्री बंगला मशीद आहे का?’

पुणे :

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात राणा दाम्पत्यावरून घडलेल्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी मातोश्री बंगला मशीद आहे का? असा सवालही केला. तसेच मी मशिदीवर जोराने बांग लागली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा असं सांगितल्याचंही राज ठाकरेंनी नमूद केलं. ते रविवारी (२२ मे) पुण्यातील सभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “मी सांगितलं होतं मशिदीवर जोराने बांग लागली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा. अनेक ठिकाणी हनुमान चालिसा लावली गेली. राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार असं म्हटलं. मातोश्री बंगला काय मशीद आहे का? मग ते मोठं प्रकरण झालं. त्यांना अटक झाली, ते तुरुंगात गेले, मधू इथं आणि चंद्र तिथे. यानंतर त्यांना सोडण्यात आलं.”

“शिवसेनेकडून राणा दाम्पत्याला वाट्टेल ते बोलण्यात आलं, राणा दाम्पत्य देखील वाट्टेल ते शिवसेनेला बोलत होते. एवढा सगळा राडा सर्वांना टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेत काम करणारे जे शिवसैनिक आहेत त्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही का?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

“जे लोकं मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आले, ज्यांच्यामुळे एवढं प्रकरण घडलं त्यांच्याबरोबर राऊत लडाखमध्ये फिरत आहेत, खांद्यावर हात ठेऊन त्यांच्याशी बोलताय, त्यांच्यासोबत जेवत आहात. हे सगळे ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व फक्त पकपक एवढ्यापुरतंच आहे,” अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!