google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

अंधेरी पोटनिवडणुकीवरून राज ठाकरे यांचे फडणवीसांना पत्र…

मुंबई:

अंधेरी पूर्व विधानसभा निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. या निवणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

असे असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपाला आवाहन केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.



राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.”दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल,” असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!