google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्र

गटनेते पदावरून हटवल्यानंतर ‘काय’ म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. यावर आता संजय राऊत यांनी भाष्य करत निष्ठा राखण्यासाठी पद गमवायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही जर खोके घेत, गुडघे टेकले असते, तर त्या पदावर राहिले असतो. आम्हालाही सांगण्यात आलं, कशाला राहताय, काय राहिलंय तिकडे, आमच्याकडे या… त्यावर मी म्हटलं थुंकतो तुमच्या ऑफरवर… बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी बेईमानी करणार नाही. अशी अनेक पद ओवाळून टाकू. आम्ही स्वाभिमानी आणि निष्ठावंत आहोत.”

“माझ्या पक्षाने भरपूर दिलं आहे. जर काही जात असेल, तर निष्ठा राखण्याासठी आम्ही गमवायला तयार आहोत. लाचारी पक्तरणारा नाही. बाळासाहेब ठाकरेंनी केलेले संस्कार निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकण्याचे नाहीत. पद आज गेलीत, उद्या परत येतील. तेवढी हिंमत आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!