महाराष्ट्र

अजित पवारांचे विमान अपघातात निधन

Ajit Pawar death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजितदादांनी अखेरचा श्वास घेतला, ज्यामुळे अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ‘सकाळी ७ वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री’ अशी त्यांची शिस्तबद्ध ओळख होती. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावला आहे. बारामतीसह संपूर्ण पुण्यात शांतता पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि मुले पार्थ व जय असा परिवार आहे.

माहितीनुसार, अजित पवार मुंबईहून एका खासगी विमानाने बारामतीकडे येत होते. सकाळी ९:१५ च्या सुमारास धावपट्टीवर उतरत असताना विमानाला आग लागली. स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बारामतीकडे प्रस्थान केले आहेत. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दिल्लीला गेले होते. तात्काळ त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!