google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘…हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे’

जगातील सातव्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत. अदानीप्रवर्तीत उद्योगसमूहाने दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचं अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या आपल्या एका अहवालात म्हटलं आहे. ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर अदानी समूहाला ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच अदानी समूहाने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.


अदानी समूहाकडून ४१३ पानांचं स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं आहे. त्यात लिहलं की, “‘हिंडेनबर्ग’चा अहवाल हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे. अदानी समूहावरील लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. हा अहवाल म्हणजे अमेरिकास्थित कंपन्यांना आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी तयार केला आहे.”


“हा अहवाल भारतातील संस्थानांच्या स्वतंत्रता, अखंडता, गुणवत्ता आणि विकासावर केलेला हल्ला आहे. विश्वासार्हता आणि नैतिकता नसलेल्या संस्थेच्या अहवालामुळे आमच्या गुंतवणूकदारांवर परिणाम झाला आहे. ‘हिंडेनबर्ग’चा अहवाल ‘स्वतंत्र’ संशोधन केलेला नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप लावून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे,” असं अदानी समूहाने म्हटलं आहे.


‘भारतावर ठरवून केलेला हल्ला’ अदानी समूहाच्या या आरोपांनी ‘हिंडेनबर्ग’नं उत्तर दिलं आहे. “अदानी समूहाच्या आरोपांशी आम्ही सहमत नाही. भारत एक लोकशाही आणि आगामी काळात महासत्ता होणारा देश आहे. पण, देशाची लूट करणाऱ्या अदानी समूहाने तिरंग्या खाली भारताचे भविष्य रोखलं आहे. फसवणूक ही फसवणूक आहे. जरी ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने केलेली असली तरी,” असं ‘हिंडेनबर्ग’ने म्हटलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!