google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

अखेर राहुल गांधी संसदेत परतले; खासदारकी बहाल

नवी दिल्ली :

अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची ऑर्डरही काढण्यात आली आहे. मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष करून आनंद साजरा केला.

लोकसभा सचिवालयाने एक ऑर्डर काढून राहुल गांधी यांना खासदारकी बहाल केली आहे. या ऑर्डरमध्ये संपूर्ण गोषवारा देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची 24 मार्च रोजी खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा नवा आदेश आला आहे. कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे, असं या नोटिशीत म्हटलं आहे.

राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आल्यानंतर ते आजच लोकसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. उद्या 8 ऑगस्ट रोजी लोकसभेत सरकार विरुद्धातील अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. 8 ते 10 ऑगस्टपर्यंत ही चर्चा चालणार आहे. त्यावर 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देणार आहेत. त्यामुळे या चर्चेत राहुल गांधी भाग घेऊन सरकारचे वाभाडे काढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याचं वृत्त येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष केला. काँग्रेसच्या कार्यालयासमोर ढोल वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!