
महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला २० कोटी; पण स्थानिकाच्या रोजीरोटीचा प्रश्न जैसे थे…
पाचगणी (महेश पवार) :
जागतिक पर्यटनस्थळ म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सव काही तासावर येवुन ठेपला आहे . पर्यटन संचानलय महाराष्ट्र शासन महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाकरीता . २० कोटी रुपायाची तरतुद शासनाकडे प्रस्तावीत असल्याची महत्वपुर्ण माहीती पर्यटन संचानलय महाराष्ट्र शासन यांनी दिली आहे . महापर्यटन महोत्सवाकरीता २० कोटीची तरतुद पर्यटन संचानालयाकडुन होत असताना . महाबळेश्वर महापर्यटनाचा नेमका उद्देष स्थानिकाच्या पर्यटना चालना देण्याचा असताना . स्थानिकाचा सहभाग या महापर्यटन महोत्सवात किती हा एक यंशोधनाचा विषय होवुन बसला आहे.
महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव पर्यटन संचानलायाकडुन राबवण्यात येत असताना . महाबळेश्वरच्या पर्यटन हंगामात पर्यटकांना आकर्षीत करुन घेत असताना . पर्यटन संचानलय महाराष्ट्र शासनाकडुन यांचेकडुन घेण्यात आलेले विविध कार्यक्रमात स्थानिकांना सामावुन न घेता . एका खाजगी कपंनीला महापर्यटन महोत्सवाचा ठेका दिला गेला आहे . महाबळेश्वरच्या ऐतिहासीक पर्यटनाला याबाबत समोर ठेवुन घेण्यात आलेले विविध कार्यक्रम खाजगी कपंनीच्या माध्यमातुन पार पाडले जाणार असल्याची चर्चा आहे . सातारा जिल्ह्यातील प्रशासन हे या महापर्यटन महोत्सवाच्या यशस्वी करण्याकरीता प्रयत्नाची पराकाष्टा करत असताना .महाबळेश्वर शहरातील नागरीकांच्या मुलभुत रोजीरोटीचा निर्णय अद्याप प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे आजही भिजत घोगड होवुन पडला असल्याचे २८ स्टॅालघारकांनी जलसमाधीच दिलेल अल्टीमेटम यावरुन लपुन राहीले नाही . महाबळेश्वर शहरात जास्त भुखंडावर विविध प्रशासकीय विभागाचा मालकी हक्क आहे . स्थानिकांना आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आजही सोडवता आला नाही हे जळजळीत सत्य लपुन राहीले नाही.
पर्यटन संचालयानाकडु महापर्यटनाला भरघोस निधीची तरतुद मात्र स्थानिकांची आजही रोजीरोटी करीता ससेहोलपट ही सुद्धा नाण्याची बाजु आहे . तसेच महाबळेश्वर शहराच्या सुशोभिकरणात ठेकेदाराकडुन उडालेले तीन तेरा हा सुद्धा प्रश्न शहरात आजही यक्ष प्रश्न होवुन बसला आहे . महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाचा पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला जात असताना . स्थानिक नागरीकानमध्ये या पर्यटन महोत्सवाबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे.
महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव साजरा होत असताना . महाबळेश्नवर शहरावर आजही जाचक अटीवर पर्यावरणाचा बालचगलबुवा दाखवत प्रशासनाकडुन स्थानिक भुमीपुत्राना रोजी रोटीचा प्रश्न आजही भेडसावत असल्याच जळजळीत सत्य लपुन राहीले नाही . स्थानिकांना डावलुन महापर्यटन महोत्सव साजरा होताना महाबळेश्वरच्या भुमीपुत्राच्या जाचक अटीचा निपटारा कधी होणार हा प्रश्न आजही अधोरेखीत आहे .