‘कंट्री फोकस’ जपानी सिनेमांनी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध
इफ्फीमधील कंट्री फोकस जपानने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले, त्यांच्या “टायगर” आणि “सीसाइड सेरेंडिपिटी” या दोन चित्रपटांच्या कलाकारांनी आणि क्रूने माध्यमांशी संवाद साधला. चित्रपट निर्मात्यांनी त्यांचा सर्जनशील प्रवास, संकल्पना आधारित प्रेरणा आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जपानचे प्रतिनिधित्व करण्याचे महत्त्व याबद्दल आपले विचार सामायिक केले ज्यामुळे या वर्षीच्या कंट्री फोकस शोकेसची खोली आणखी वाढली.
“टायगर” हा चित्रपट मालिश करणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीची कथा सांगतो, ज्याचा मालमत्तेच्या मालकीवरून त्याच्या बहिणीशी सततचा संघर्ष त्याला एका गंभीर टप्प्यावर घेऊन जातो, ज्यामुळे नैतिक सीमा धूसर होतात. ही कथा एलजीबीटीक्यू + समुदायासमोरील आव्हाने देखील अधोरेखित करते ज्यामुळे ओळख, हक्क आणि सामाजिक स्वीकृतीचे मुद्दे समोर येतात.
माध्यमांना संबोधित करताना, चित्रपटाचे दिग्दर्शक अंशुल चौहान यांनी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान सामोरे जावे लागलेल्या सर्जनशील आणि भावनिक गुंतागुंतींबद्दल सांगितले. अशा संवेदनशील विषयाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद लाभेल याची त्यांना सुरुवातीला भीती वाटली कारण एलजीबीटीक्यू नसलेला चित्रपट निर्माता म्हणून एलजीबीटीक्यू समस्या मांडण्यासाठी त्या समुदायाप्रती अधिक जबाबदारी, संवेदनशीलता आणि आदर आवश्यक आहे.
माध्यमांशी संवाद साधताना “सीसाइड सेरेन्डिपिटी” चे कार्यकारी निर्माते तोमोमी योशिमुरा यांनी त्यांचे अनुभव आणि सर्जनशील प्रवासाचे वर्णन केले. भारतीय प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड कौतुकाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, त्यांचा जिव्हाळा आणि उत्साहामुळे इफ्फीमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन अधिक अर्थपूर्ण झाले असे त्यांनी नमूद केले.
संवादादरम्यान, तोमोमी यांनी चित्रपटामागील मुख्य विषयाचा दृष्टिकोन अधोरेखित केला . मुले आणि प्रौढांमधील पिढीजात अंतर कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही कथा वयोगटातील सामंजस्य वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये तरुण आणि वृद्ध दोघांनाही प्रतिध्वनीत करणारे दृष्टिकोन सादर केले आहेत.
एका शांत समुद्रकिनारी वसलेल्या शहरात चित्रित सीसाईड सेरेंडिपिटी हा चित्रपट दीर्घकाळापासून राहत असलेल्या निर्वासित समुदायाचे चित्रण करतो ज्यांचे जीवन कलाकारांच्या आगमनाने आणि असामान्य घटनांच्या मालिकेने प्रभावित होते. मध्यमवयीन विद्यार्थी सोसुके आणि सतत बदलणाऱ्या शहरावर केंद्रित, ही कथा हृदयस्पर्शी दृश्यांच्या माध्यमातून मुलांचा दृढ संकल्प आणि अर्थाच्या शोधात असलेले प्रौढ यावर प्रकाश टाकते. अपूर्ण तरीही कोमल पात्रांचे चित्रण करणारा, हा चित्रपट प्रेम आणि नातेसंबंध यांचा उत्सव साजरा करतो आणि संपूर्ण महोत्सवात तो प्रेक्षकांना आकर्षित करत राहील अशी आशा टीमने व्यक्त केली.






