google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘बांगलादेशींना पासपोर्ट जारी करणे राष्ट्रीय सुरक्षेला धोका’

पणजी :

गोव्यात बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट दिल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगून काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी पाच बांगलादेशींच्या घुसखोरीची आणि प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून (आरपीओ) तीन बांगलादेशी नागरिकांना भारतीय पासपोर्ट जारी करण्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.


पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमार्गे भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या पाच बांगलादेशींना गोव्यातून बेकायदेशीरपणे भारतीय पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात बोलताना चोडणकर यांनी त्यांना पासपोर्टसाठी पोलिस मंजुरी कशी मिळते, असा प्रश्न उपस्थित केला.


त्यांनी देशात घुसखोरी कशी केली आणि कोणत्याही स्थानिक कागदपत्रांशिवाय इथे कसे राहिले याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.


“यावरून हे सिद्ध झाले आहे की गुप्तचर संस्था आणि सीमा सुरक्षा दल बांगलादेशींच्या भारतात बेकायदेशीर प्रवेश रोखण्यात अपयशी ठरले आहेत. यावरून हे सुद्धा सिद्ध होते की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आपल्या सीमांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत,” असे चोडणकर म्हणाले.


या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे खोटे प्रेम उघड झाले आहे, असे ते म्हणाले.


“परराष्ट्र व्यवहार मंत्रालयही या प्रकरणामुळे उघडे पडले आहे. काँग्रेसच्या राजवटीत हे घडले असते तर विरोधी पक्षात असलेल्या भाजपने आम्हाला लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रवादाचा मुद्दा बनवला असता. आज ते आमच्या सुरक्षेशी निगडीत असलेल्या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत,” असे चोडणकर म्हणाले.


“या बांगलादेशी नागरिकांना गोव्यातून पासपोर्ट मिळाले आणि तेही पोलीस मंजुरी मिळाल्यानंतर. गोव्यातील नागरिकांना पासपोर्ट मिळवताना त्रासदायक प्रक्रियेतून जावे लागते, परंतु जे राज्याचे रहिवासी नाहीत त्यांना पासपोर्ट मिळाला,” असे चोडणकर म्हणाले.


“मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रक्रियेत चूक करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि जे आपल्या देशाचे नागरिक नाहीत त्यांना पोलीस मंजुरी देणे चूक आहे,” असे ते म्हणाले.


गोव्याच्या गृहमंत्र्यांनी हा मुद्दा गंभिरतेने घ्यायला पाहिजे. सावंत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आणि गृहखाते व्यवस्थित चालवण्यात अपयशी ठरले आहेत,’ असे चोडणकर म्हणाले.


चोडणकर यांनी राष्ट्रीय सल्लागार समितीमार्फत चौकशी करून जबाबदारी निश्चित करून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याची जोरदार मागणी केली.


ते म्हणाले, “हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने राज्य सरकारनेही सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली पाहिजे,” असे ते म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!