google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘माझा संघर्ष सुरू आहे आणि…’

राहुल गांधी यांना आज सुरत कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना जामीन मंजूर केला आहे. तर त्यांच्या दुसऱ्या याचिकेवरची सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. मात्र सुरत कोर्टातून जामीन मिळताच राहुल गांधींसह सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

यानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्वीट चर्चेत आहे. माझा संघर्ष सुरू आहे आणि सत्य हेच माझं अस्त्र आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है। इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे असं वक्तव्य कायम करतात. त्यावर टोमणा मारत सध्या मित्र काळाच्या विरोधात लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे. या संघर्षात सत्य हे माझं अस्त्र आहे आणि सत्याचाच मला आधार आहे या आशयाचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम त्यांच्या मित्रांची मदत करतात असा आरोप कायमच राहुल गांधी करत असतात. त्यानंतर आता त्यांनी या आशयाचंच ट्वीटही केलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!