google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळा : कॅनडा सरकार

खलिस्तान टायगर फोर्सचा ( केटीएफ ) नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडादरम्यान संबंधांमध्ये तणावर निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. अशातच कॅनडा सरकारनं पुन्हा एकदा भारताला डिचवलं आहे. कॅनडातील नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. त्यात भारतातील केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळण्याचा सल्ला कॅनडा नागरिकांना दिला आहे.

कॅनडा सरकारनं सांगितल्यानुसार, “सुरक्षिततेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचा प्रवास टाळावा. तिथे दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. यातून लडाख या केंद्र शासित प्रदेशाला वगळण्यात आलं आहे.”

खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टड्रो यांनी पार्लटमेंटमध्ये केला. मात्र, हे आरोप ‘निर्थक आणि कोणाची तरी फूस असलेले’ आहेत अशी टीका भारताने केली.

४५ वर्षीय हरदीप सिंग निज्जर हा प्रतिबंधित केटीएफचा (खलिस्तान टायगर फोर्स) प्रमुख होता आणि भारताकडून सर्वाधिक शोध घेतल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांपैकीच एक होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतामधील सरे येथील गुरुद्वारात १८ जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!