google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

‘संजय राऊत म्हणजे अदखल पात्र’

कराड (अभयकुमार देशमुख) :

संजय राऊत हे सकाळी उठल्यानंतर एकाद तरी भडक विधान केल्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नाही. त्यामुळे त्या पात्राची महाराष्ट्राने फार दखल घ्याव, असं काही ठेवलं नाही, अदखल पात्र अशी गणना संजय राऊतांची झालेली आहे, असा हल्लाबोल बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आ. शहाजीबापू पाटील यांनी केला.

shahaji patil
शहाजीबापू पाटील

कराड येथे एका कार्यक्रमानिमित्त आ. शहाजीबापू पाटील होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते. पुढे आ. पाटील म्हणाले, संजय राऊतांनी घडवलेलं जे काही होते. आय काॅंग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेना हे बाैध्दिक किंगमेकर झालेले होते. त्यांना हा टोला बसलेला आहे अन् त्याच्या तो जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे ते रोज सकाळी उठल्यानंतर काहीतरी बोलत राहतायत. त्यात कुठलेही तथ्य नाही, तो एक राजकीय डावपेचातील एक भाग आहे.

बाळासाहेबांची शिवसेना गटाला फायदा
जोगेंद्र कवाडे हे एक आंबेडकरवादी चळवळीतील प्रभावी नेते आहेत. त्याचे विचार, वक्तृत्व प्रभावी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना गटाला या युतीचा मोठा फायदा होईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!