google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कराड तालुक्यात ‘अवकाळी’ने गरिबांना केलं बेघर…

'महावितरण'चे देखील लाखो रुपयांचे नुकसान....

सातारा ( महेश पवार) :

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून वाऱ्यासह जोरदार आलेल्या पावसाने आहाकार माजवला आहे मसूर रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे उमळून पडल्याने अनेक वाहने अडकून राहिली दरम्यान यावेळी अडकलेल्या एसटी महामंडळाच्या चालक वाहकांनी तसेच बस मधील प्रवाशांनी पडलेली झाड हटवण्यासाठी पुढाकार घेतला व रस्ता मोकळा केला.

अचानक व जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तासवडे एमआयडीसी परिसरामध्ये बेघर वस्ती मधील लोकांचे घरावरील पत्रे उडाले यामुळे परिसरातील गरीब कुटुंब रस्त्यावर आली.

दरम्यान झालेल्या वादळी पावसामध्ये महावितरणचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये विजेचे खांब मोडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . यामुळे परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे.

karad news

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!