google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. समितीच्या ६ पैकी ४ सदस्यांनी रेपो रेट वाढवण्याच्या निर्णयाच्या बाजुने मतदान केलं. या नव्या वाढीसह आता रेपो रेट ६.५० टक्के इतका झाला आहे. मे २०२२ पासून आतापर्यंत एकूण सहावेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. ही वाढ २.२५ टक्के इतकी आहे. यानंतर आता गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार आहेत. याची थेट झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

अनेकदा बँका भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतात. जेव्हा आरबीआय इतर बँकांना दिलेल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करते तेव्हा रेपो रेट वाढला असं म्हणतात. आरबीआयने व्याजदर वाढवले की, कर्जाऊ भांडवल घेणाऱ्या बँकाही तोटा होऊ नये म्हणून आपल्या ग्राहकांना दिलेल्या कर्जाच्या व्याज दरात वाढ करतात.

व्याजदरवाढीचा बोजा स्वत: सहन न करता तो भार ग्राहकांवर टाकणं हे बँकांसाठी नित्याचं आहे. बँकांच्या नफ्याचं प्रमाण किती आहे यावर व्याजदर वाढीचा बोजा आपण सोसायचा का? किती सोसायचा? हे कर्जदात्या बँका व वित्तसंस्था ठरवतात. थकित कर्जांचं प्रमाण जास्त असलेल्या वित्तसंस्थांची बॅलन्स शीट सक्षम नसल्याने व्याजदरवाढीचा बोजा तुमच्यावर ढकलला जाऊन तुमचा ईएमआय वाढायची शक्यता जास्त आहे.

अशाप्रकारे रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केल्याने थेट आपला ईएमआय किंवा कर्जाचा मासिक हप्ता वाढू शकतो आणि सर्वसामान्याचं आर्थिक गणित अडचणीत येऊ शकतं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!