google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘का’ मानले काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचे आभार?

पणजी:

काँग्रेसने बुधवारी भाजपला त्यांच्या विचारसरणीचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आणि भ्रष्टाचार, पक्षांतर करणाऱ्यांना प्रवेश देणे आणि निवडणूक रोख्यांचा वापर करून व्यावसायिकांची पिळवणूक करणे हा त्यांचा हेतू आहे का ते पहावे असे म्हटले आहे. 

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके यांनी बुधवारी काँग्रेस हाऊस येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जनतेचा पैसा लुटल्याचा आरोप केला.


उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर आणि सांताक्रुझ गटाचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यावेळी उपस्थित होते.


एसबीआयला निवडणूक रोख्यांची यादी जाहीर करण्यास भाग पाडल्याबद्दल त्यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.
भिके म्हणाले की, एकेकाळी श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील आयुष मंत्रालय रामदेव बाबांना कोविड दरम्यान दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरले.


भिके म्हणाले की, एकेकाळी श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील आयुष मंत्रालय रामदेव बाबांना कोविड दरम्यान दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरले.


ते म्हणाले, “रामदेव बाबांच्या कृत्यांचा पर्दाफाश केल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत.”


देश आणि राज्यासाठी काँग्रेसने काय केले असा प्रश्न विचारणाऱ्या भाजपावर टिका करतना त्यांनी या पक्षाला विचारले की ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि गोवा मुक्तीसाठी लढले होते का?


“आम्ही देश आणि गोव्यासाठी काय केले हे त्यांनी आम्हाला विचारू नये. देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी आमच्या नेत्यांनी काय केले हे सर्वांना माहीत आहे. भाजपने आपली ‘निष्ठा’ ‘रॉयल्टी’कडे वळवली आहे आणि लोकशाही संपवण्यासाठी विचारसरणी भ्रष्ट केली आहे, घोटाळे आणि पक्षांतर करणाऱ्यांचे स्वागत केले आहे,” असे भिके म्हणाले.


“भाजप भ्रष्ट व्यवहारात आहे आणि निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळण्यात विलीन झाले आहे. भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये, त्यांचा पक्ष भ्रष्टाचारात किती गुंतला आहे ते त्यांनी पाहावे,’’ असे भिके म्हणाले.


ते म्हणाले की, भाजप नेते सध्या निवडणुकीच्या काळात आशीर्वाद घेण्यासाठी धार्मिक स्थळांना भेट देत आहेत, कारण त्यांनी देवांशीही विश्वासघात केला आहे.


‘‘भाजप सर्वच बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला होता. मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एका उच्चपदस्थ व्यक्तीने लावलेल्या या आरोपांची चौकशी करण्यात भाजप सरकार का अपयशी ठरले,’’ असा प्रश्न त्यांनी केला.


“भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्यांना या पक्षाने पूर्वी भ्रष्ट राजकारणी म्हटले होते. पण त्यांच्यात सामील होताच ते शुद्ध होतात. यावर भाजपने बोलले पाहिजे, असे भिके म्हणाले.

….

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!