google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

आपत्ती व्यवस्थापनच एक आपत्ती : अमरनाथ पणजीकर

पणजी :

पणजीत आज तरंगता मृतदेह दिसला असता, तो ताब्यात घेण्यासाठी सरकारी यंत्रणेची होडी ३ तास उपलब्ध होवू शकली नाही.  या घटनेने परत एकदा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संपूर्ण अपयश उघड झाले आहे. जर ही परिस्थिती मृतदेह ताब्यात घेण्यासाठी असेल, तर देवानेच आता सर्वांना सुरक्षित ठेवावे अशी आम्ही प्रार्थना करुया, असा टोला कॉंग्रेस माध्यम विभाग प्रमूख  अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.


पणजी येथील जेट्टीजवळ तरंगताना सापडलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोट येण्यास उशीर झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सुसज्ज ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.


भाजप सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत नाही. त्यांचे लक्ष फक्त मिशन टोटल कमिशनसाठी इव्हेंट आयोजित करण्यावर आहे, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.


बचाव यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी सरकारकडे योग्य उपकरणे, मनुष्यबळ तसेच कौशल्य नाही. अग्निशमन विभाग आजही सुमारे 20 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने खरेदी केलेल्या फायर ब्रिगेड वाहने वापरत आहे. रुग्णवाहिका आणि हर्स व्हॅनचीही तीच परिस्थिती आहे, असे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले.

गोव्यात सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मुद्दा काँग्रेस पक्षाने वेळोवेळी उपस्थित केला आहे. दुर्दैवाने, सरकार ते पूर्णपणे कार्यान्वित करण्याची तसदी घेत नाही, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!