google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘कृष्णा’ने गाठला तळ; काटकसरीने पाणी वापराचे आवाहन

कराड (महेश पवार) :

कृष्णा नदीतील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्याने नदीत पाणी सोडण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर व्हावा, यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर उपसा बंदीचा आदेश जारी केला आहे.

पावसाळा लांबल्यामुळे व कोयना धरणात पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे सध्या धरणातून केवळ १०५० क्युसेक इतकाच विसर्ग सुरू आहे.टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनांचे आवर्तनही अंशतः सुरू आहे.

सध्या कोयना धरणात १२.३७ टीएमसी व वारणा धरणात ११.७६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याचा उपलब्ध पाणीसाठा व तापमानातील वाढ विचारात घेता पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरवणे आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, इतर पिण्याच्या पाण्याच्या योजना व इतर सिंचन योजनांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा,असे आवाहन विभागाने केले आहे.

पिण्याचे पाणी पुरवणे अत्यावश्यक असल्याने पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर पाणी उपशाला बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!