
‘राजं, मेघडंबरीच्या दिखाव्यापेक्षा सातारकरांना हवाय विकास…’
सातारा ही ऐतिहासिक आणि मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते , याचं राजधानी साताऱ्याच्या नगरपालिकेवर कधी उदयनराजे भोसले तर कधी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे सत्ता राहिली . परंतु तरीदेखील सातारचा म्हणावा इतका विकास झाला नाही . सातारा शहरातील रस्त्यांचा प्रश्न असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल किंवा महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न, त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न ,पाणी पुरवठ्यासह अनेक सुविधांचा वणवा असताना देखील मेघडंबरी साठी लाखो रुपये खर्च करण्यामागचा हेतू काय , यामुळे राजधानी सेल्फी पॉईंट नंतर सातारकरांना नवीन दिखावा म्हणजे मेघडंबरी उभारण्यात आले की काय अशी जोरदार चर्चा सातारा शहरात सुरू आहे . यामुळे सातारकरांना सेल्फी पॉईंट पेक्षा साताऱ्याचा खरा विकास हवाय असे दिखावे नकोत अशी जनमानसातून प्रतिक्रिया उमटत आहे.