google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘लोकशाहीवरील अध्याय हटवून मोदी सरकार देशाच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात…’

पणजी :

नरेंद्र मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करत आहे आणि लोकशाही आणि राष्ट्रीय संघर्षाचे अध्याय हटवून आरएसएसची विचारधारा जोडत असल्याचा आरोप एनएसयूआय गोवा विभागाने केला आहे.

एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि ते म्हणाले की एनसीईआरटीमधून लोकशाही आणि विविधतेचे अध्याय वगळण्यात आले आहेत.

“लोकप्रिय संघर्ष चळवळी आणि लोकशाही अध्यायांपुढील आव्हानेही वगळण्यात आली आहेत. जेव्हा हे महत्त्वाचे अध्याय वगळले जातात तेव्हा आपल्या देशाची मुले काय शिकणार आहेत,” असा प्रश्न त्यांनी केला.

ते म्हणाले की, नववीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील महत्वाचे अध्याय एनसीईआरटीने काढले आहेत. “भाजप आणि मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही हे त्यांनी संसदेत विरोधकांचे माईक बंद करून विरोधकांचा आवाज कसा दाबला जातो हे दाखविले आहे. आता पहिल्यांदा मतदान करायला जाणाऱ्या मतदारालाही इतिहासाची माहिती न मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत,” असे चौधरी म्हणाले.

भाजप सरकारने केलेली शिक्षणाची सध्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना लोकशाहीचे पैलू जाणून घेण्यापासून वंचित करेल. “ते महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा इतिहास पुसून टाकत आहेत आणि देशासाठी काहीही न करणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांचे अध्याय जोडत आहेत,” असे सांगून ते म्हणाले की स्वातंत्र्यलढ्यात आरएसएस आणि भाजपचे काहीच योगदान नव्हते.

चौधरी म्हणाले की, भाजप हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या नावावर जातीय राजकारण खेळत आहे.


ते म्हणाले की एनसीईआरटी अभ्यासक्रमाच्या मुख्य सल्लागारांनी नव्या अध्यायांचा आक्षेप घेतला आहे आणि त्यांच्या संमतीशिवाय नवीन विषय जोडण्यात आल्याचे सांगितले आहे. “त्यांनी पुस्तकांमधून त्यांची नावे वगळण्यास सांगितले आहे कारण त्यांनी नवीन अभ्यासक्रम तयार केला नाही, तो भाजप आणि आरएसएसने केला आहे,” असे ते म्हणाले.

“भाजप सरकारने मुख्य सल्लागारांना बायपास केले आहे आणि त्यांना हवे अध्याय घेतले आहे,” असे चौधरी म्हणाले.

दिल्ली विद्यापीठात, मौलाना आझाद यांचा धडा बॅचलर ऑफ आर्ट्स शाखेतून काढला गेला आहे असे ते म्हणाले. “ते पहिले शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान दिले आहे. मात्र ते अल्पसंख्याक असल्याने त्यांचा अध्याय वगळण्यात आला आहे,’ असा आरोप त्यांनी केला.


ते म्हणाले की, बीएच्या अभ्यासक्रमात विनायक दामोदर सावरकर यांचे अध्याय जोडले आहेत. “त्याने दाखल केलेल्या दयेच्या याचिकेशिवाय देशासाठी त्यांचे काहीही योगदान असेल तर भाजपने ते दाखवावे,” असे ते म्हणाले.

“भारत हा महात्मा गांधीजींच्या विचारसरणीचा आचरण करणारा देश आहे, मात्र भाजप आता त्यांची हत्या करणाऱ्याचे अध्याय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी दिल्ली विद्यापीठही आंबेडकरांचा अभ्यासक्रम हटवून सावरकरांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे. ते शिक्षण व्यवस्थेचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत,’’ असे चौधरी म्हणाले.


मोदी सरकार अल्पसंख्याकांना महत्त्व देत नसल्यामुळे मौलाना आझाद यांच्या नावाची शिष्यवृत्ती बंद केली आहे, असे ते म्हणाले.

जिल्हा अध्यक्ष शेन रिबेलो यांनी यावेळी बोलताना ही तर लोकशाहीची हत्त्या असल्याचे म्हटले. ” मोदी सरकारला हुकुमशाहीचा प्रसार करायचा आहे. यासाठी लोकशाही अध्याय काडून त्यांना हवे ते पाठ्यपुस्तकात देण्यात आले आहे. अशाने विद्यार्थ्यांना लोकशाहीची माहिती कशी मिळेल,” असा प्रश्न त्यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!