google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

‘संभाजी भिडेना फाशी देणार का?’

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. हा विषय विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. महाविकासआघाडीतील नेत्यांनी भिडेंच्या वक्तव्यावर गंभीर आक्षेप घेत, त्यांच्या अटकेची मागणी केली. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेंना फाशी देणार का? असा सवाल केला आहे.


नाना पटोले म्हणाले, “राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, महापुरुषांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांच्या केवळ मुसक्या बांधू नये, तर रस्त्यावर फाशी द्यावी असं त्यांचं मत आहे. आता आमचा सवाल आहे की, संभाजी भिडेंना देवेंद्र फडणवीस देणार का?

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, “आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अटक करायला हे तयार आहेत. मात्र, ज्याला देशातून तडीपार केलं पाहिजे त्या नालायक माणसाला द्वेषपूर्ण भाषण देण्याची मुभा आहे. हे कोणतं राजकारण आहे आणि हा शासन चालवण्याचा कोणता प्रकार आहे.”

“आम्ही रविवारपर्यंत (३० जुलै) शांत बसू. तोपर्यंत संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही, तर आम्ही आंदोलन छेडू. तेव्हा ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी सरकारला दिला.

संजय शिरसाट म्हणाले, “संभाजी भिडेंनी अशी वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असं माझंही मत आहे. ते दरवेळी काही तरी वादग्रस्त वक्तव्य करतात. माझ्या शेतातली आंबे खा म्हणजे पोरं होतात हा कोणता तर्क आहे. असं बोलणं योग्य नाही. संभाजी भिडेंचा कुणी सन्मान करत असेल, तर याचा अर्थ तोंडात येईल ते बोलणं योग्य नाही. मीही त्यांचा निषेध करतो.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!