google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘पणजी आणि वास्को राष्ट्रीय जलमार्ग आयुष्य सुखकर करेल’

गोव्यातील पणजी आणि वास्को या शहरांना जोडणारा राष्ट्रीय जलमार्ग – 68 तयार झाल्याने पणजी आणि वास्को या शहरांतील अंतर 9 किमी ने कमी झाले आणि आता हा प्रवास केवळ 20 मिनिटांत पूर्ण करत येतो, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. पूर्वी पणजी ते वास्को अंतर जवळपास 32 किमी होते आणि त्यासाठी 45 मिनिटे एवढा वेळ लागत होता.

केंद्रीय बंदरे, जहाज उद्योग आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले, पणजी आणि वास्को दरम्यान या नव्या मार्गामुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे तसेच, यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

“पणजी ते वास्को दरम्यानच्या या दळणवळण व्यवस्थेमुळे लोकांची सोय होईलच, शिवाय पर्यटनालाही चालना मिळेल.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!