google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘गोवा बुडालेला असताना मुख्यमंत्र्यांकडुन स्नेहमेळाव्याचे आयोजन’

पणजी :

संपुर्ण गोव्यात पावसाने थैमान घातले आहे. लोकांची घरे व रस्ते बुडालेले असताना व नागरीत हवालदिल होऊन मदतीची याचना करीत असतानाच, असंवेदनशील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी बुधवार दि. ६ जुलै रोजी एका स्नेहमेळाव्याचे आयोजन करणे हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांना भाजप सरकारचे १०० दिवस साजरे करण्याचा नैतीक अधिकार नसुन, भाजपचा निर्लज्जपणा उघड झाला आहे अशी घणाघाती टिका कॉंग्रेसचे विधीमंडळ गट नेते व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे.

भाजप सरकारच्या १०० दिवसपुर्ती निमीत्त मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातुन मला सदर स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. भाजप सरकारचा असंवेदनशीलपणा यातुन उघड होत आहे.

आज संपुर्ण गोवा पावसाच्या अतिवृश्टीने जवळजवळ बुडाला आहे. लोक बेघर झाले आहेत. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी खरेतर लोकांना मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे होते. दुर्देवाने मुख्यमंत्री स्नेहमेळावे आयोजित करुन उत्सव साजरे करण्यात धन्यता मानत आहेत अशी बोचरी टिका संकल्प आमोणकर यांनी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर स्नेहमेळाव्याचे आयोजन रद्द करावे. सरकारी तिजोरीतुन जनतेचा पैसा वायफळ खर्च करण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही. सरकारने खर्च कपात करुन जनतेला मदत करणे गरजेचे आहे असे संकल्प आमोणकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!