google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्र

‘देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही’

“आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. आपले देवी-देवता मारामारी करणारे आहेत, त्यामुळे आपण त्यांची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंह महाराज, राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती, तर आपण त्यांची पूजा केली असती का?,” असा सवाल उपस्थित करत “देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही,” असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलं आहे.


राजपूरमधील धर्मसंसदेत बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज चर्चेत आले होते. महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केल्यानं कालीचरण महाराज यांना अटकही झाली होती. त्यातच आता पुन्हा कालीचरण महाराज यांनी केलेलं आणखी एक विधान चर्चेत आलं आहे.

दरम्यान देशात ४६ कोटी लोक मुस्लीम आहेत. त्यामुळे येणाऱ्या १० वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल, असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलं.


विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा कालीचरण महाराज संबोधित करत होते. “देशात ६० टक्के महिला मतदानाला जात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही मुस्लीम महिला होणार आहात. आपलं राहणीमान आणि मुस्लिमांचं राहणीमान यात जमीन-आसमानचा फरक आहे,” असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.


“देशात 140 करोड जनता आहे. त्यात ९४ करोड हिंदू आहे, तर ४६ करोड हे मुस्लीम आहेत. त्यामुळे येणारा दहा वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल. महिलांना बुरख्यात राहावं लागेल,” असं कालीचरण महाराज म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!