google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘राजघराण्याच्या नावावर मते मिळविण्याचे दिवस संपले’

सातारा (महेश पवार) :

सातारा बाजार समिती निवडणुकीत विरोधक शेतकरी पॅनेलचा १८-० ने दणदणीत पराभव करून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या अजिंक्य पॅनेलने बाजार समिती बाबाराजेंचीच असल्याचे दाखवून दिले. राजघराण्याच्या नावावर मते मिळविण्याचे दिवस संपले अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी यानिमित्ताने खा. उदयनराजेंना टोला लगावला.

सातारा बाजार समितीचा सोमवारी दुपारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृतरित्या निकाल घोषित करण्यात आला. बाबाराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

याप्रसंगी बाबाराजे तथा आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, राजघराण्याच्या नावावर मतं मिळविण्याचे दिवस आता संपलेत हे उदयनराजेंनी लक्षात ठेवावे. लोक कुणाच्या पाठीमागे आहेत हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. मनोमीलन तुटल्यानंतर उदयनराजेंचा सर्वच ठिकाणी पराभव झाला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!